महावितरणने सुमारे ६५०० विद्युत सहाय्यकांची भरती प्रक्रिया एसएससीच्या बेस्ट ऑफ फाईव्ह ऐवजी एकूण सरासरी गुणांच्या आधारे राबवण्याचे ठरवले आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कंपनीने ही भरती प्रक्रिया एकूण सरासरी गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या एकूण सरासरी गुणांची टक्केवारी महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे दिलेल्या प्रणालीवर नोंदवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment